अमरावती-मुंबई विमानाचे तिकीट दुरंतो पेक्षा स्वस्त

♦ बेलोरा विमानतळावरून अलायन्स एअरचे पहिले प्रवासी उड्डाण १६ एप्रिलला होणार

♦ विमान सेवेमुळे वाचणार 10 तास 10 मिनिटे वेळ‎

का टा वृत्तसेवा
अमरावती : अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून अलायन्स एअरचे पहिले प्रवासी उड्डाण १६ एप्रिलला होणार आहे. तिकिटाचा विचार करता सध्या अमरावती-मुंबई ७२ आसनी प्रवासी विमानाचे तिकीट हे २५०० ते ३३०० रुपयांपर्यंत आहे. भविष्यात तिकिटाला मागणी वाढली की, दर वाढू शकतात, असे विमानोड्डाण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. परंतु, विमान व सुपरफास्ट ट्रेनच्या तिकीट दराची तुलना केल्यास विमानाचा तिकीट दर कमी असून वेळही कमी लागतो. बडनेराहून मुंबईकडे जाणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस दुरंतोच्या एसी प्रथम श्रेणी तिकिटापेक्षाही विमानाचे तिकीट स्वस्त असल्याचे दिसून येत आहे.
                          दुरंतोचे तिकीट २७५० रुपये आहे. ही सुपरफास्ट एक्स्प्रेस बडनेरा येथून मुंबईला ९ तास ३० मिनिटांत जाते. त्या तुलनेत विमान केवळ ४५ मिनिटांत मुंबई गाठते. चेक इन व चेक आऊटसाठी एक ते दीड तासाचा वेळ लागतो. तरी विमानाने कोणत्याही एक्स्प्रेसच्या तुलनेत वेगाने, कमी वेळात मुंबईला पोहोचता येणार आहे.

                           अमरावतीहून सायंकाळी ७.१० वाजता मुंबईकडे निघणाऱ्या अमरावती-मुंबई अंबा एक्स्प्रेसच्या प्रथमश्रेणी तिकीट दराचा विचार केल्यास तो २४६५ रुपये आहे. विमानाचा तिकीट दर हा २५०० रुपये अर्थात जवळ-जवळ सारखाच आहे. वेळेचा विचार करता अंबा एक्स्प्रेस ही पहाटे ६.१५ वाजता सीएसएमटीला पोहोचते. यासाठी प्रवाशांना रात्रभर ११ तास ५ मिनिटे प्रवास करावा लागतात. तेच विमानाने अमरावतीहून मुंबईला गेल्यास केवळ ४५ मिनिटे लागतील. १० तास २० मिनिटांची बचत होईल.
                            अमरावती-मुंबई अंतर ५५५ नॉटिकल मैल अमरावती-मुंबईदरम्यान हवाई अंतर हे ५५५.२२ नॉटिकल मैल आहे. तर रेल्वे मार्गाने हे अंतर ६७० किमी. आहे. रेल्वे मार्गाच्या अंतराच्या तुलनेत हवाई अंतर कमी आहे. त्यामुळे वेळ, पैसा, दगदग याची बचत होणार आहे. मुंबईला जायचे असल्यास सकाळच्या विमानाने जाता येईल. त्यामुळे रात्र वाया जाणार नाही. सोबतच मुंबईहून कमी वेळात अमरावतीला परत येता येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News