कामगार टाइम्स

विषारी दारूचा कहर! 22 जणांचा मृत्यू; आधी दृष्टी गेली, मग शरीर निळे पडले

मेथॅनॉल भेसळीचा संशय; 112 हून अधिक जण रुग्णालयात दाखल | विषारी दारू शरीरातील रक्त आम्लयुक्त करून डोळ्यांची नस आणि महत्त्वाच्या अवयवांवर करते गंभीर परिणाम भोपाळ : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात विषारी दारूमुळे मोठी दुर्घटना घडली असून, प्रशासनाच्या माहितीनुसार आतापर्यंत 22 जणांचा मृत्यू, तर 112 हून अधिक जण रुग्णालयात दाखल आहेत. काही रुग्णांची दृष्टी गेली, तर काहींचे शरीर निळे पडल्याचे समोर आले आहे. या घटनेत मेथॅनॉल भेसळीचा संशय असून, विशेष म्हणजे 5 सप्टेंबर रोजी उत्पादन शुल्क विभागाने संबंधित दारू पिण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनेकांना विषबाधा झाली. क्षेत्रीय अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली, 5 अधिकारी निलंबित झाले, 30 हून अधिक नामजद आरोपींवर एफआयआर (FIR) दाखल झाला, 14 जणांना

राष्ट्रीय

मनोरंजन

आंतरराष्ट्रीय

सोशल मिडिया

लक्षवेधी


क्रीडा

गुन्हेवार्ता

DELHI WEATHER