अमेरिकेच्या मध्यस्थीने व आग्रहाने भारत व पाकिस्तान शस्त्रसंधी?
‘‘पाकविरोधात लष्करी कारवाईचे सर्वाधिकार सेनेला होते, मग युद्धविराम करायचा कीं नाही हें सेनेलाच ठरवू द्यायला पाहिजे होतें?’’. भिकेला लागलेल्या पाकिस्ताननें न पेलवणारे युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी अनेक देशांना विनंती केली. अन्य सधर्मी राष्ट्रांचा दबाव व भारतासोबत कुरघोडी करणाऱ्या देशांसमोर युद्ध बंदीसाठी मध्यस्थी करावी यासाठी लाचारी पत्करणाऱ्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची आयती संधी आपण गमावल्याची, (कदाचित भाबडी) खंत देशातील प्रत्येक तरूण मनाला वेदना देणारी आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी गमावण्यासाठी, भविष्यात आपल्याला मोठी किंमत मोजावी लागू नये?
अमेरिकेच्या मध्यस्थीने व आग्रहाने भारत व पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाले. यानुसार पाकच्या लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांनी भारताच्या समपदस्थांना दूरध्वनी वरून शांतीचर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावरही तान म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राघ्यक्षाने तडकाफडकी युद्धबंदीची घोषणा करणे हे कितपत योग्य आहे?