भारत पाक शस्त्रसंधी, अमेरिकेची घोषणा: अनाकलनीय?

अमेरिकेच्या मध्यस्थीने व आग्रहाने भारत व पाकिस्तान शस्त्रसंधी?

                   ‘‘पाकविरोधात लष्करी कारवाईचे सर्वाधिकार सेनेला होते, मग युद्धविराम करायचा कीं नाही हें सेनेलाच ठरवू द्यायला पाहिजे होतें?’’. भिकेला लागलेल्या पाकिस्ताननें न पेलवणारे युद्ध थांबविण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी अनेक देशांना विनंती केली. अन्य सधर्मी राष्ट्रांचा दबाव व भारतासोबत कुरघोडी करणाऱ्या देशांसमोर युद्ध बंदीसाठी मध्यस्थी करावी यासाठी लाचारी पत्करणाऱ्या पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची आयती संधी आपण गमावल्याची, (कदाचित भाबडी) खंत देशातील प्रत्येक तरूण मनाला वेदना देणारी आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी गमावण्यासाठी, भविष्यात आपल्याला मोठी किंमत मोजावी लागू नये?
                        अमेरिकेच्या मध्यस्थीने व आग्रहाने भारत व पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी तयार झाले. यानुसार पाकच्या लष्करी कारवाई विभागाच्या महासंचालकांनी भारताच्या समपदस्थांना दूरध्वनी वरून शांतीचर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावरही तान म्हणजे अमेरिकेच्या राष्ट्राघ्यक्षाने तडकाफडकी युद्धबंदीची घोषणा करणे हे कितपत योग्य आहे?

 

 

                       अशी कोणती मजबुरी भारतासमोर होती, या चर्चेची वेळ दुपारी साडेतीनची ठरली आणि शस्त्रसंधी साडे पाचला?. यासाठी सरकारने संसदेच्या विरोघी पक्षनेते राहूल गांधीसह सर्वपक्षीय नेत्यांना विस्वासात घेउनच् शस्त्रसंधी करणे अपेक्षीत असतांना, हा आगाउपणाच असल्याचे अनेकांची मतं आहेत. कारण 100 टक्के देश सरकारच्या पाठीशी असतांना हे घडलंच् कसं यावर गोदी मिडीया वगळता, सर्वांसाठी न उलगडणारे कोडं आहे. यावर भविष्यात गांभिर्याने मंथन होने आहेच्?
                      अश्या वेळेस आपल्या अटींवर तरी युद्धविराम करायला हवा होता. पाकसमर्थित आतंकवाद्यांनी/ दहशतवाद्यांनी भारतीय सरहद्दीवरून घुसखोरी करून पुलवामा, पहलगाम इ. देशातील विविध ठिकाणी शेकडो निरपराध सैनिकांची व नागरिकांची नृशंस हत्या केली, त्या सर्व आतंकवाद्यांना भारताच्या हवाली करण्याच्या अटीवर आणि ह्या पुढे पाकिस्तान आतंकवाद्यांना प्रशिक्षण किंवा मदत अशी कोणतीही कृती करणार नाही अशी पाकिस्तानशी लिखीत शस्त्रसंधी करूनच/ करतानाच भारताने भविष्यातील कुरापती रोखण्यासाठी कठोर भूमिका घ्यायलाच हवी होती. असं सर्वसामान्य मत आहे.
                         भविष्यातील कोणतेही दहशतवादी कृत्य हे भारताविरोधातील युद्ध मानले जाईल आणि त्यानुसारच प्रत्युत्तर दिले जाईल, असा सज्जड इशारा भारताने दिल्याचे कळते. यापुढे अमेरिकेच्या तालावरंच् नाचायचं का? हेच् सरकारी धोरण राहणार असेल तर 140 करोड जनतेनं आतांच् सतर्क झालेलं बरं?
» सतीश तांडेकर (कळमेश्वर-ब्राम्हणी) मो. नं. 8007485789

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News