भारत माता की जय’ च्या निनादात खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रा

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ यांच्या नेतृत्वात खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रा

‘आमदार डाॅ. आशिष देशमुख’ यांनी केले भव्य तिरंगा यात्रेचे यशस्वी आयोजन

का टा वृत्तसेवा 
नागपूर : ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तान विरोधात भारतीय सैन्याने गाजवलेल्या पराक्रमाच्या सन्मानार्थ खापरखेडा येथे भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन आज आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी केले होते. यावेळी संपूर्ण खापरखेडा नगरी तिरंगामय झाल्याचे चित्र होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ‘भारत माता की जय’ च्या निनादात खापरखेडा येथील भव्य तिरंगा यात्रेत हजारो नागरिकांसमवेत भाजपा, इतर पक्षाचे नेते व कार्यकर्ते सामील झाले होते.
                       ‘पाकिस्तानने पहलगाम येथे निरपराध पर्यटकांवर जो भ्याड हल्ला करून त्यांची निर्मम हत्या केली, त्यावर कारवाई करत ‘आॅपरेशन सिंदूर’ राबवून भारतीय सैन्याने त्यांना सडेतोड उत्तर दिले. भारतीय सैन्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय सैन्याच्या अतुलनिय शौर्याची अनुभूती सार्या जगाने अनुभवली. सर्वोत्कृष्ट असलेल्या भारतीय सैन्य दलामुळेच आपण सर्व सुरक्षित आहोत. आमदार डाॅ. आशिष देशमुख यांच्या आवाहनानंतर खापरखेडा येथे सर्वपक्षीय नेते व जनसामान्यांनी जो अभुतपूर्व प्रतिसाद दिला आहे,
                        तसाच ग्रामीण भागातूनही भारतीय सैन्यांप्रती आदर, राष्ट्र प्रेमाची भावना व्यक्त व्हायला हवी. भारतीय सैन्याने जी कामगिरी केली आहे, ती अविस्मरणीय असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले आहे. आजच्या या तिरंगा यात्रेत अन्य पक्षांचे नेते, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने स्वयंस्फुर्तीने सामिल झाल्याने प्रत्येकात राष्ट्रभावना प्रकर्षाने जाणवल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
                         महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनीही भारतीय सैन्यदलाप्रती आदराची भावना व्यक्त केली. आपला देश सुरक्षित हातात असून कुठल्याही अतिरेकी हल्ल्याला किंवा पाकिस्तानच्या सैनिकांना उत्तर देण्यास आपले भारतीय सैन्यदल समर्थ असल्याचेे ते म्हणाले.
                          आपले प्रास्ताविकात डाॅ. आशिष देशमुख म्हणाले, ‘भारत-पाकिस्तान युध्दाच्या पार्श्वभूमीवर आपल्या वीर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, देशभक्तीचा संकल्प घेण्यासाठी आणि नागपूर जिल्ह्याच्या ऐक्याचे दर्शन घडवण्यासाठी या तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.’ ‘ऑपरेशन सिंदूर’ च्या माध्यमातून दहशतवादी हल्ला करणार्या पाकिस्तानला पराभूत केले आहे. भारतीय लष्कराच्या पाठीशी जिल्ह्यातील जनता खंबीरपणे उभी आहे. या तिरंगा यात्रेत सर्व पक्षाचे नेते सहभागी झाले आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे. खापरखेडा येथील यात्रेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे, त्यातून भारतीय सैन्य दलाबद्दल असलेला विश्वास प्रामुख्याने दिसून येतो. भारतीय लष्कराला सलाम..!

                          भाजपाच्या या तिरंगा यात्रेत पक्षाचे आ. चरणसिंग ठाकूर, डाॅ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, अशोक धोटे, दिलीप धोटे, प्रगती मंडल, इमेश्वर यावलकर,  अजय वाटकर, संदिप उपाघ्ये, प्रमोद हत्ती इ. भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी सैनिक व हजारोंच्या संख्येत नागपूर जिल्ह्यातील नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते. या भव्य तिरंगा यात्रेने खापरखेडा व आजूबाजूचा परिसर ‘भारत माता की जय’ च्या जयघोषणांनी दुमदुमला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News