महात्मा बसवेश्वरांचा जयंती कार्यक्रम संपन्न

‘संत-महापुरूषांचे विचार डोक्यात घ्या, डोक्यावर नाही’ : ज्ञानेश्वर रक्षक

काटा वृत्तसेवा : संजय गणोरकर
नागपूर : नागपूर येथे महात्मा बसवेश्वरांचा जयंती कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्याचे गाढे अभ्यासक ज्ञानेश्वर रक्षक यांना प्रमुख वक्ता म्हणून निमंत्रीत करण्यात आले होते. त्यांनी आपले विचार व्यक्त करतांना, महात्मा बसवेश्वरांनी 12 व्या शतकात अस्पृश्यता निवारण्यासाठी मिश्र विवाह, ब्राम्हण पुत्र आणि अस्पृश्य मुलीशी लावून तत्कालीन समाजव्यवस्थेला छेद देवून व जातीव्यवस्था समूळ नष्ट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे सविस्तर विवेचन केले. आजही 21 व्या शतकात जातीव्यवस्थेचे चटके समाज जीवनात आम्ही सोसत असल्याचे ते म्हणाले.
                        भगवान बुध्दापासन चाललेला परिवर्तनाचा लढा शिक्षणाने आजतागायत सुधारला नाही. ‘श्रध्दा’ आमच्या सहज अंधश्रध्देत बदलून, संत-महापुरूषांना प्रतिमा रूपाने पुजेत आम्ही बसवतो, देवत्व बहाल करतो, परंतू त्यांचे विचार लाल फडक्यात बांधून फुले वाहून पुजतो, पण आत्मसात करून अंमलात आणत नसल्याची खंत व्यक्त करत, यावर गांभिर्याने चिंतन करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन रक्षक यांनी व्यक्त केले. संत महापुरूषांचे विचार डोक्यात घ्या डोक्यावर नाही? असेही ते म्हणाले.

                          याप्रसंगी शिवा अखिल भारतीय विर शैव संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते. जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय कल्लावार यांनी संघटनशक्तीचे महत्व सांगत महात्मा बसवेश्वरांनी संगितलेल्या मानवीमूल्याची समस्त विश्वाला गरज असल्याने या विचारांना तरूण पिढीपर्यंत पोहचवणे, ही काळाची गरज असल्याचेही कल्लावार म्हणाले. तसेच कार्यक्रमाचे यशस्वीतेत आपले मोलाचे यांगदान देणार्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News