या प्रसंगी उप संचालक व जिल्हा अधीक्षक यांच्या मार्गदर्शनानुसार तयार केलेल्या सामान्य जनतेसाठी भूमी अभिलेखची ओळख यावर उप अधीक्षक प्रकाश वानखडे यांनी पीपीटी सादर केली. तसेच मान्यवरांच्या हस्ते कार्यालयातील उत्कृष्ट कर्मचारी विशाल गुडधे, शरद सोनपरोते, प्रफुल्ल खारोडे, संदीप तायडे, सचिन चौधरी, रेखा गावंडे, पवन काळे, राहुल बोबडे, भूषण घनबहादुर, शोभा भेले, प्रणिता गाडगे, मनोज सोनवणे, अनुप काळबांडे यांचा प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
प्रकाश वानखडे यांनी भूमी अभिलेख विभागाने महास्वामित्व अभियानांतर्गत ड्रोन सर्व्हेद्वारे तयार केलेल्या मिळकत पत्रिकेची माहिती, व्हर्जन २ द्वारे मोजणी काम, ई-फेरफार, डिजिटल नकाशा, सर्व ऑनलाइन सेवा व त्यांचा उपयोग कसा करावा, विभागातील विविध जुने अभिलेख व त्यांचे महत्व तसेच या वर्षात १ हजार ३५० च्या वर मोजणी प्रकरणे व फेरफार निकाली काढून जनतेला मोजणी नकाशा व आखीव पत्रिका देण्यात आल्याची माहिती दिली.
या प्रसंगी उपस्थित सामाजिक कार्यकर्ते मनोज तायडे यांनीही मार्गदर्शन करताना जनतेने भूमी अभिलेख विभागाच्या बदललेल्या स्वरूपाला समजून घ्यावे. कर्मचाऱ्यांनीही नवीन ऑनलाइन प्रणालीत गोर गरीब शेतकऱ्याला मदत करावी, असे आवाहन केले. शेतकरी नीळकंठ साखरे यांनी मनोगत व्यक्त केले.
या वेळी दर्यापूर तालुक्यातील शरद आठवले, धनराज राऊत, किशोर राऊत, मणिपाल गजभिये, शरद ठाकरे, श्याम इताळ, बंटी आठवले, करण सेन, मो. आबिद, शशिकांत आठवले, राजू राजगुरे, सुनील डगवार, प्रशांत भगत व सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी उपस्थित होते.