वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा, अनुदानाची मागणी
का टा वृत्तसेवा
वरुड/ शेंदुरजनाघाट : वरुड तालुक्यात गेल्या वर्षी सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा पिकांच्या नुकसान भरपाई मिळण्याकरिता महसुल यंत्रणेमार्फत जानेवारी महिन्यात याद्या प्रसिद्ध करीत लाभार्थी शेतकऱ्यांना आवाहन करून सेतू केंद्रातून ई-केवायसी करायला सांगीतली. शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली. मात्र, त्यावर महिनाभरापेक्षा जास्त कालावधी लोटला असून अद्यापही नुकसानग्रस्त संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. शासनाने त्वरित अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी लाभार्थी संत्रा उत्पादकांकडून करण्यात येत आहे.