गरिबांसाठी 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार : नितीन गडकरी

‘‘या देशात विचार भिन्नता नाही, तर विचार शुन्यतेची सर्वात मोठी समस्या आहे’’ : नितीन गडकरी

 ‘श्री सरस्वती कराड हास्पिटल’चे उद्घाटन

काटा वृत्तसेवा
पुणे : ‘‘या देशात विचार भिन्नता नाही तर विचार शुन्यतेची सर्वात मोठी समस्या आहे’’ असे विचार केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ना. गडकरी  ‘श्री सरस्वती कराड हास्पिटल’ (एसएसकेएच) चे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशातील सामान्य व गरीब व्यक्तींच्या सुखान्ताचा ग्राफ वाढविणे अत्यंत गरजेचे आहे. सेवा परमोधर्म असून सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत ती पोहचवावी. सेवा आणि संस्काराच्या माध्यमातूनच गोरगरीब जनतेची सेवा करावी.
                         माईर्स एमआयटी शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. डाॅ. विश्वनाथ कराड यांच्या मातोश्री स्वर्गीय सरस्वती कराड यांच्या स्मृती प्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘श्री सरस्वती कराड हाॅस्पिटल’ (एसएसकेएच)चे उद्घाटन ना. गडकरी यांनी फीता कापून केले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
                        यावेळी तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन व राज्यसभेच्या खासदार सौ. मेधा कुलकर्णी, जगप्रसिद्ध संगणक शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डाॅ. विश्वनाथ कराड हे असतील. तसेच, माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा.पी.बी.जोशी, एमआयटी शिक्षण संस्थेच्या सहव्यवस्थापकीय विश्वस्त डाॅ. सुचित्रा कराड-नागरे, कार्यकारी संचालक डाॅ. विरेंद्र घैसास, उषा विश्वनाथ कराड, एमआयटी एडीटीचे कार्याध्यक्ष डाॅ. मंगेश कराड, हभप तुळशीराम कराड आणि हाॅस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. तुषार खाचणे उपस्थित होते.
                        आयुष्यमान योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारने गरीबांसाठी ५ लाख रुपयांपर्यतच्या उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सामाजिक संवेदनशीलता आणि जाणिव ठेऊन नागपूर येथे गरिबांसाठी सर्व वैद्यकीय सेवा अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News