जीएम उत्पादनांच्या आयातीवरून नीती आयोगाच्या निर्णयावर टीका
मुंबई : शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी निती आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. निती आयोग उद्योगपतींची रखेल असल्यासारखे वागत असल्याचे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. जीएम उत्पादन आणि संशोधनास भारत सरकारने बंदी घातलेली आहे. मात्र दुसरीकडे नीती आयोगाने अमेरिकेत उत्पादित झालेल्या जीएम उत्पादित सोयाबीन, मक्का आणि कृषी उत्पादित पदार्थांवरील आयात कर कमी करून आयात करण्याचा सल्ला दिला आहे. यावरुन राजू शेट्टी यांनी निशाणा साधला आहे.
या संदर्भात राजू शेट्टी यांनी एका पोस्टच्या माध्यमातून नीती आयोगाच्या निर्णयावर टीका केली आहे. या निर्णयामुळे कृषिप्रधान भारत देशातील सोयाबीन, गहू, भात, मका उत्पादित शेतकऱ्यांवर संकट येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांची राख रांगोळी करून सोळा लाख कोटींचे कर्जे राइट ऑफ करणाऱ्या उद्योगपतींचे उत्पादने निर्यात करण्यासाठी देशाचे नीती आयोग काम करत असल्याचा आरोप देखील राजू शेट्टी यांनी केला आहे.
राजू शेट्टी यांनी केलेली पोस्ट देखील पहा..
देशाचे निती आयोग या देशातील उद्योगपतींची रखेल असल्यासारखे वागत आहे. जैवविविधता व मानवी आरोग्यास धोका होईल या कारणांमुळे जीएम उत्पादन व संशोधनास (जीएम) भारत सरकारने बंदी घातली आहे. मात्र दुसरीकडे नीती आयोगाने अमेरीकेत उत्पादित झालेल्या जीएम उत्पादित सोयाबीन, मक्का व कृषी उत्पादित पदार्थांच्या वरील आयात कर कमी करून आयात करण्याचा सल्ला दिला आहे.
यामुळे कृषिप्रधान भारत देशातील सोयाबीन, गहू, भात व मक्का उत्पादक शेतकऱ्यांवर संकट येणार आहे. देशभरातील शेतकऱ्यांची राखरांगोळी करून 16 लाख कोटीची कर्जे राइट ॲाफ करणाऱ्या उद्योगपतींची उत्पादने निर्यात करण्यासाठी देशाचे निती आयोग या देशातील उद्योगपतींची रखेल असल्यासारखे वागत आहे.