पाचवीतील मुलीचे लग्न, 7 जणांवर गुन्हा

बीडमधील मुलीच्या आई-वडिलांसह दोघा नवरदेवांचा समावेश‎

बीड‎ : पाचवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा एकाच दिवसात‎दोन वेळा बालविवाह लावल्याने, ७ जणांवर शिवाजीनगर ‎‎पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यात मुलीचे ‎‎आई-वडील, पहिला विवाह ज्याच्यासोबत लावला तो‎तरुण, त्याचे आई-वडील, दुसरा विवाह करणारा तरुण ‎‎आणि विवाह लावणारा काझी यांच्यावर गुन्हा नोंदवला‎आहे.‎
                        बीड शहरातील १३ वर्षीय मुलीचा गुरुवारी एकाच‎दिवसात काही तासांच्या अंतराने दोन वेळा विवाह‎लावण्यात आला. सकाळी ३२ वर्षीय तरुणासोबत विवाह‎लावला. त्याला आधीच दोन बायका असून दोघी नांदत‎नाहीत. त्यापैकी एकीने या विवाहाची माहिती पोलिसांना‎कळवली होती. त्यानंतर पोलिस कारवाईसाठी येत‎असल्याचे पाहून पहिल्या नवरदेवाने पळ काढला. नंतर‎दुसरा नवरदेव उभा करुन बालिकेचा त्याच्यासोबत विवाह‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎लावण्यात आला.
                        या प्रकरणी महिला व बालविकास‎विभागाचे तालुका संरक्षण अधिकारी मन्सूर अन्सार‎अहमद निसार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बालिकेचे‎आई-वडील, पहिला नवरदेव सुलेमान पठाण, त्याची‎आई मुमताज पठाण, वडील जर्जिस पठाण (रा. बेलखंडी‎पाटोदा, ता. बीड), दुसरा नवरदेव आसिफ शमशूद शेख‎(रा. खांडवी, ता. गेवराई) आणि विवाह लावणारे काझी‎मंजूर मौलाना यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधक‎कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.‎

मुलीची स्वाधारगृहात केली रवानगी‎ 

                       या घटनेतील  अल्पवयीन मुलीला शुक्रवारी पोलिसांनी‎बालकल्याण समितीसमोर हजर केले. समितीने या‎मुलीला संरक्षणाची गरज असल्याने स्वाधारगृहात‎ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुलीला‎स्वाधारगृहात पाठवले.‎

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News