रेल्वेत विनाकारण साखळी ओढणाऱ्यांवर कारवाई

२०२४ मध्ये ८३४ जणांना अटक;

३.५० लाख रुपयांचा दंड वसूल

नागपूर : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाने रेल्वेत विनाकारण साखळी ओढणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली आहे. २०२४ मध्ये अशा ८४७ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. यामध्ये ८३४ जणांना अटक करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार दोषींकडून ३,५०,१९५ रुपये दंड वसूल करण्यात आला.

                        विभागीय सुरक्षा आयुक्त दीप चंद्र आर्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत २०८ प्रकरणांमध्ये १९३ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १६,९०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  रेल्वे कायद्याच्या कलम १४१ नुसार विनाकारण साखळी ओढणे हा फौजदारी गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी एक वर्षाचा तुरुंगवास किंवा १००० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. रेल्वे सुरक्षा दलाने स्पष्ट केले की हा केवळ कायदेशीर गुन्हा नसून सामाजिक दुष्कृत्य देखील आहे
                          रेल्वे प्रशासनाने अशा कृतींविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. विनाकारण साखळी ओढणाऱ्यांवर कडक कारवाई करून अशा कृती खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News