जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्धारी : प्रा. संध्या राजूरकर

♦ अंधश्रद्धा निर्मूलन राज्यस्तरीय महिला परिषद थाटात उद्घाटन

♦ विविध व्याख्याने, परिसंवाद, गटचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजनाने उपस्थितांना मंत्रमुग़्ध केले.

नागपूर: महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा राज्य महिला विभाग आणि सामाजिक न्याय विभाग, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय अंधश्रद्धा निर्मूलन महिला परिषदेचे उद्घाटन शनिवारला सकाळी 10.30 वाजता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेंशन सेंटर, कामठी रोड, इंदोरा परिसर, नागपूर येथे थाटात संपन्न झाले.महाराष्ट्र अनिसच्या महिला परिषदेचे उद्घाटन प्रसिद्ध विचारवंत रविंद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी मंचावर ज्ञानेश्वर रक्षक गुरुदेव सेवा मंडळ, बाबासाहेब देशमुख उपायुक्त समाज कल्याण विभाग तसेच सुकेशिनी तेलगोटे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग नागपूर उपस्थित होते.
                      ‘‘महिलांनो विवेकवादी व्हा, विज्ञान वादी व्हा, वैज्ञानिक दृष्टिकोन मनात रुजवा. मुलांना शिकवा ?’’ जागृतीसाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. ‘‘जिच्या हाती शिक्षणाची दोरी ती जगाला उद्धारी’’ असे विचार दै. बहुजन सौरभ च्या निवासी संपादक प्रा. संध्या राजूरकर यांनी व्यक्त केले. त्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्यव्यापी महिला परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलत होत्या.
                        मान्यवरांच्या स्वागतानंतर या महिला परिषदेचे उद्घाटन अनोख्या पद्धतीने करण्यात आले. महिलांनी भूतबाधा, नक्षबळी, वृतवैकल्यें, तंत्र मंत्र, चेटूक अंधश्रद्धा यांच्या बेड्या अंगावर ठोकल्या व उद्घाटक रविंद्र पंढरीनाथ व इतर मान्यवरांनी त्या तोडल्या व उद्घाटन केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. या महिला परिषदेची प्रस्तावना करतांना अॅड. मुक्ता दाभोलकर म्हणाल्या कि उपवासापेक्षा आपुलकीची व क्रोधापेक्षा करुणेची गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलना साठी महिलांनी अधिकाधिक महिला जोडाव्या कारण महिलाच अंधश्रद्धेच्या बळी ठरतात व वाहक होतात. कार्यक्रमाचे संचालन प्रिती नगराळे यांनी केले.
                         या प्रसंगी उत्कृष्ट ट्रायबल आर्ट्स, वारली आणि गोंडी पेंटिंग यासाठी महाअंनिस भंडारा शाखेचे डॉ. वामन शेडमाके यांच्या कन्या सृष्टी शेडमाके तसेच श्रद्धा व अंधश्रद्धा या विषयावर उत्कृष्ट चित्रप्रदर्शनसाठी द्वितीय पुरस्कार प्राप्त शिवानी लामकाने यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार केला. संविधानाचे प्रास्ताविक अवनी चव्हाण हिने केले. कार्यक्रमाचे संचालन प्रिती नगराळे यांनी केले. तर आभार विजया श्रीखंडे यांनी मानले.
                         दुुसरे सत्रात खुली गट चर्चा तसेच स्त्रियांचे विशिष्ट जीवनानुभव व अंधश्रद्धा या परिसंवादात  स्त्रियांचे आरोग्य विषयक समस्या आणि अंधश्रद्धा या विषयावर  पालघर अंनिसच्या कार्यकर्त्या स्वाती भोईर यांनी सहभाग  घेऊन त्यांच्या गटाची मांडणी केली. विविध व्याख्याने, परिसंवाद, गटचर्चा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजनाने उपस्थितांना मंत्रमुग़्ध केले. कळमेश्वर येथील प्रसिद्ध शाहिर अरूण सहारे यांनी आपल्या गीत गायनाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
                        या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी प्रा. पुष्पा घोडके, वर्षा सहारे, प्रिया गजभिये, देवानंद बडगे, चित्तरंजन चैरे, रामभाऊ डोंगरे, चंद्रशेखर मेश्राम, नरेश महाजन, देवयानी व डाॅ. सुनील भगत, मंगला गाणार यांनी प्रयत्न केले. आज परिषदेच्या दुसरे दिवशी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News