बीड : पाचवीत शिकणाऱ्या १३ वर्षीय मुलीचा एकाच दिवसातदोन वेळा बालविवाह लावल्याने, ७ जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यात मुलीचे आई-वडील, पहिला विवाह ज्याच्यासोबत लावला तोतरुण, त्याचे आई-वडील, दुसरा विवाह करणारा तरुण आणि विवाह लावणारा काझी यांच्यावर गुन्हा नोंदवलाआहे.
बीड शहरातील १३ वर्षीय मुलीचा गुरुवारी एकाचदिवसात काही तासांच्या अंतराने दोन वेळा विवाहलावण्यात आला. सकाळी ३२ वर्षीय तरुणासोबत विवाहलावला. त्याला आधीच दोन बायका असून दोघी नांदतनाहीत. त्यापैकी एकीने या विवाहाची माहिती पोलिसांनाकळवली होती. त्यानंतर पोलिस कारवाईसाठी येतअसल्याचे पाहून पहिल्या नवरदेवाने पळ काढला. नंतरदुसरा नवरदेव उभा करुन बालिकेचा त्याच्यासोबत विवाहलावण्यात आला.
या प्रकरणी महिला व बालविकासविभागाचे तालुका संरक्षण अधिकारी मन्सूर अन्सारअहमद निसार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बालिकेचेआई-वडील, पहिला नवरदेव सुलेमान पठाण, त्याचीआई मुमताज पठाण, वडील जर्जिस पठाण (रा. बेलखंडीपाटोदा, ता. बीड), दुसरा नवरदेव आसिफ शमशूद शेख(रा. खांडवी, ता. गेवराई) आणि विवाह लावणारे काझीमंजूर मौलाना यांच्याविरोधात बालविवाह प्रतिबंधककायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुलीची स्वाधारगृहात केली रवानगी
या घटनेतील अल्पवयीन मुलीला शुक्रवारी पोलिसांनीबालकल्याण समितीसमोर हजर केले. समितीने यामुलीला संरक्षणाची गरज असल्याने स्वाधारगृहातठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मुलीलास्वाधारगृहात पाठवले.