बोगस शालार्थ आयडी महाघोटाळ्यात भाजपाचे दिलीप धोटे यांना बेड्या
का टा वृत्तसेवा I संजय श्रीखंडे
नागपूर : बोगस शालार्थ आयडी महाघोटाळ्यात पाच शिक्षकांचे बनावट आयडी तयार करून, त्यांच्या १० वर्षांच्या अरियर्सची रक्कम हडपणारा आरोपी मोहपा येथील दिलीप भास्कर धोटे (६२) यांस पोलिसांनी शनिवारी अटक करून न्यायालयात हजर केले. पोलीसांनीे आरोपी धोटेंची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडी घेतल्याची माहिती आहे. आरोपी श्री विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व भाजपाचा धापेवाड्याचा माजी पंचायत समिती सदस्य असून धोटे यांना अटक झाल्यानंतर शनिवारी जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. यामुळे शालार्थ आयडी घोटाळ्यात बोगस नियुक्त्या करून कोट्यावधींची माया जमवणाऱ्या संस्था चालकांना घाम फुटला आहे.
शिक्षण विभागात गोलमाल, ५ शिक्षकांच्या बोगस आयडी केल्या तयार
बोगस शालार्थ घोटाळा प्रकरणात संस्था चालकांना अटक करण्याचे सत्र सुरूच असून, एसआयटी स्थापन झाल्यानंतर पोलिसांनी गोंदियातील संस्था चालकाला अटक केली होती. त्यानंतर शनिवारी पोलिसांनी दिलीप धोटे यांना ५ शिक्षकांचा बोगस आयडी तयार केल्याप्रकरणी अटक केली आहे. सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप धोटे, श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थेचे अध्यक्ष असलेल्या कळमेश्वर तालुक्यात प्रतिभा उच्च प्राथमिक शाळा (मोहपा) व धापेवाडा पब्लिक स्कूल अशा दोन शाळा आहेत. दिलीप धोटे यांनी काही वर्षापूर्वी शाळेत ८ शिक्षकांची बोगस कागदपत्रांच्या आधारे नियुक्ती करून अधिकाऱ्याच्या मदतीने त्यांचे शालार्थ आयडी तयार केले.
या शिक्षकांचे नियमित वेतन काढून अधिकार्यांच्या संगमताने त्यांची महालच्या नवयुवक प्राथमिक शाळेत बदली केली. यातील ५ शिक्षकांचा १० वर्षांचा अरियर्स काढण्यासाठी म्हणजे प्रत्येक शिक्षकांचे १३ ते १४ लाख रुपये काढून देण्यासाठीही त्यांनी शिक्षकांकडून पैसे वसूल केले. यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार त्यांनी केल्याची माहिती आहे. दिलीप धोटे यांना अटक केल्यानंतर सायबर पोलिसांनी त्यांना सत्र न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
दोन दिवसांपूर्वी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस आयुक्तांकडे काटोल तालुक्यातील दोन राजकीय नेत्यांच्या पत्नींची नियुक्ती बोगस असल्याची तक्रार केली होती. तपासादरम्यान तथ्य समोर आल्यावरून एसआयटीच्या कारवाईचा बुल्डोजर किती? अधिकारी, कर्मचारी व संस्थाचालकांवर फिरणार हे लवकरंच् कळेंल.
‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ : राजकीय क्षेत्रात खळबळ:
राजकिय वरदहस्त असलेल्या अश्या आरोपींसाठी पक्ष व पक्षाचे नेते काय पावले उचलणार? यांवर ‘भ्रष्टाचारमुक्त भारत’ ची पाठराखण करणारे चार हात दुरंच् असल्याची चर्चा आहे. या कारवाईचा लवकर येवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकींवर काय परिणाम होतो, तेही कळेल. शिक्षणक्षेत्रातील या सर्वसामान्यांच्या जिव्हाळयाच्या व तीतकांच गंभीर विषयांवर सर्वांचीच नजर आहे. पोलीसांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आरोंपींवर कठोर कारवाई करावी, अशी प्रतिकीया आमचे प्रतीनिधीजवळ अनेंकांनी व्यक्त केली आहे.
साहाय्यक पोलिस आयुक्त सुनीता मेश्राम
पोलिस उपायुक्त राहुल मदने, साहाय्यक पोलिस आयुक्त सुनीता मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली एसआयटी या प्रकरणाचा तपास करीत असून, आणखी ४० संस्थाचालक एसआयटीच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येते.