शेतकरी पीक कर्ज व योग्य बियाणे, किटकनाशक-खतांपासून वंचित राहता कामा नये : आ. डाॅ. आशिष देशमुख
का टा वृत्तसेवा
कळमेश्वर : ‘‘शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन बदल घडून यावा, यासाठी शासनाच्या विविध नविनतम योजनांची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी नियमितपणे शेतकऱ्यांना द्यावी.’’ अशी सुचना कळमेश्वर-सावनेर क्षेत्राचे आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी आज पंचायत समिती कार्यालय कळमेश्वर येथे आयोजीत ‘खरीप हंगामपूर्व कृषी विभाग नियोजन सभेत केली. सभेत सावनेर व कळमेश्वर या दोन्ही तालुक्यांचा आढावा घेण्यात आला.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांना गांभिर्याने घेत आ. डाॅ. आशिष देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात नवीन बदल घडून यावा, यासाठी शासनाच्या विविध नविनतम योजनांची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी नियमितपणे शेतकर्यांना द्यावी. शेतकऱ्यांना पेरणीसाठी उच्च गुणवत्ता असलेले बियाणे, बोगस बियाणांवर कठोर नियंत्रण ठेवून कोण्त्याही परिस्थीतीत शेतकऱ्यांची फसगत होणार नाही याची संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळजी घेण्याच्या तसेच बोगस बियाण्यांवर कठोर कारवाईसाठी भरारी पथक तात्काळ सक्रिय करण्याच्या सुचनाही आ. देशमुख यांनी केल्या आहेत.
आता जिल्हा सहकारी बँक कार्यरत झाली असून जास्तीतजास्त शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करतांना अधिकार्यांनी कोणतीही कारणे दाखवू नयेत. गरजवंत कोणताही शेतकरी पीककर्जापासून अलिप्त ठेवू नये, याची दक्षता घेण्याच्याही सुचना देशमुख यांनी केल्या.
ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पतेतुन साकारलेली ‘मदर डेअरी’ प्रकल्पाचे उदाहरण देत, सावनेर-कळमेश्वर क्षेत्रात असा प्रकल्प कुठेही नाही. शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढन्याच्या उद्देशाने जोडधंद्या म्हणून मदर डेअरी प्रकल्प प्रस्ताव पाठवण्याच्या सुचना आ. देशमुख यांनी केल्या. भाजीपाला, फुलशेती, कोबी इ. साठी नवीनतम पीक पद्धती अवलंबून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा होइल यासांठी सर्व अधिकाऱ्यांनी पारदर्शकतेने मेहनतीने आपले कर्तव्य करण्यासोबतच जलयुक्त शिवार या योजनेला कृषी विभागशी जोडून पाण्याची पातळी वाढविण्याचे प्रयत्न करावे. यात कोणत्याही अधिकारी कर्मचाऱ्यांने कुचराही न करण्याची तंबीही आ. देशमुख यांनी भरसभेत दिली.
ज्या प्रकारे राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाचा सन 2023-24 चा ‘यशवंत पंचायतराज पुरस्कार’ साठी ‘कळमेश्वर पंचायत समिती’ राज्यात अव्वल ठरली आहे, त्याप्रमाणे सावनेर-कळमेश्वर क्षेत्रासाठी यावर्षी कृषी विभागानेही राज्यातून प्रथम क्रमांकासाठी प्रयत्न करण्याच्यासाठी प्रोत्साहीत केले. यावेळी आ. डाॅ. देशमुख यांनी शेतकऱ्यांच्या वतीने अनेक प्रश्नांवर कृषी अधिकाऱ्यांना विचारणा करून सुचना केल्या. यावर्षी कापूस, तूर, सोयाबीन मुख्य पीक असून कपाशीचे क्षेत्र वाढुन सोयाबीनचे क्षेत्र कमी होणार असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे..
या वेळी डाॅ. राजीव पोतदार, मनोहर कुंभारे, इमेश्वर यावलकर, दिलीप धोटे, प्रमोद हत्ती, अजय वाटकर, दिलीप डाखोळे, एसडीओ सम्पत खलाटे, तहसीलदार रोषन मकवाने, बीडीओ अंशुजा गराटे, तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी सावनेर-कळमेश्वर तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.