परदेशी शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस
का टा वृत्तसेवा
नागपूर : सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना परदेशात विशेष अध्ययन करण्यासाठी अर्ज सादर करण्यास २० मे हा शेवटचा दिवस आहे.
या योजनेसाठी विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी. या योजनेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.