August 15, 2025 1:39 am

राहुल गांधींकडे आरोपांचा पुरावा नाही : मुख्यमंत्री‎

मतचोरीवर प्रत्युत्तर : ‎ठाकरे कफनचोरांचे सरदार- मुख्यमंत्री‎

लातूर‎ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना‎ निवडणूक आयोगाने चार वेळा पत्र पाठवले. तरी ते आरोपांचे पुरावे देत ‎नाहीत. त्यांना पराभव पचवता येत‎नाही, सहनही होत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी‎ केली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत त्यांना‎आम्ही कफन चोरांचे सरदार म्हटले‎ तर चालेल का? असा सवाल‎ उपस्थित केला.‎
                         लातूर जिल्हा परिषदेच्या प्रांगणात ‎‎भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे‎ यांच्या पुतळ्याचे अनावरण‎ करण्यासाठी मुख्यमंत्री सोमवारी‎आले होते. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने ‎सोमवारी राज्यभर निदर्शने केली आणि मुख्यमंत्र्यांना चोरांचे सरदार का ‎संबोधले, असा प्रश्न विचारला असता ‎‎मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबई ‎‎महानगरपालिकेत कोविड काळात‎कफन खरेदीत चोरी झाली.त्यामुळे‎आम्ही उद्धव ठाकरे यांना कफन‎चोरांचे सरदार म्हणायचे का ? असे प्रश्न मुख्यमंत्र्यांनी केला. मंत्री पंकजा‎ मुंडे, धनंजय मुंडे उपस्थित होते.‎

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News