वादळात मंडपाचा तारेला ‎स्पर्श; दोघे चुलतभाऊ ठार‎

नांदेडमधील बोरगावची घटना; तिसरा भाऊ जखमी‎

नांदेड : लोखंडी लग्न मंडपाला पडदे बांधत ‎‎असताना अचानक आलेल्या‎ वादळामुळे मंडप उडाला. त्यामुळे‎वर असलेल्या उच्चदाब ‎वीजवाहिनीला मंडपाचा स्पर्श‎ झाला. या घटनेत मंडप बांधण्याचे ‎काम करणाऱ्या ५ कामगारांपैकी‎ तिघांना विजेचा धक्का लागून ते‎ खाली पडले. त्यातील दोघा ‎‎चुलतभावांचा मृत्यू झाला तर तिसरा ‎‎गंभीर जखमी झाला. जखमीवर ‎हदगाव येथील उपजिल्हा ‎रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही ‎‎घटना रविवारी (२० एप्रिल) ‎मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास ‎बोरगाव (ता.हदगाव) येथे घडली.‎ या घटनेत पांडुरंग भट्टेवाड (२४)‎आणि साईनाथ भट्टेवाड (२३) यांचा ‎मृत्यू झाला, तर शिवप्रसाद भट्टेवाड ‎याच्यावर उपचार सुरू आहेत.‎
                        बोरगाव (ह) येथील प्रकाश शिंदे ‎यांच्या मुलीचे रविवारी लग्न होते. ‎लग्नासाठी लोखंडी पाइपांचा मंडप ‎टाकण्याचे काम मध्यरात्रीपासून सुरू ‎होते. त्याचवेळी अचानक ‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎सोसाट्याचा वारा सुटल्याने अर्धवट ‎अवस्थेत बांधलेला मंडप उचलला‎ गेला. वर असलेल्या उच्चदाब‎ वीजवाहिनीला मंडपाचा स्पर्श ‎झाला. त्यामुळे मंडपाला पकडून‎ ठेवणाऱ्या ५ जणांना शॉक लागला.‎ सर्वांना तातडीने रुग्णालयात‎ हलवले, दोघांना मृत घोषित केले.‎

शवविच्छेदनानंतर मृतदेह संतप्त ‎नातेवाइकांनी महावितरणच्या‎ कार्यालयात

                         शवविच्छेदनानंतर मृतदेह संतप्त ‎नातेवाइकांनी महावितरणच्या‎ कार्यालयात आणले. ग्रामपंचायत‎ कार्यालयाने अनेकवेळा ठराव ‎घेऊनही गावातील ११ केव्ही क्षमतेची ‎उच्चदाब वीजवाहिनी ग्रामपंचायत‎आणि सोसायटीच्या प्रांगणातून ‎महावितरणने हटवली नाही, असा‎आरोप केला.‎

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News