February 7, 2026 4:05 am

अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिबिरात घुसखोरीचा प्रयत्न, धक्का-मुक्की

अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिबिरात घुसखोरीचा प्रयत्न, धक्का-मुक्की;

‘सीएम योगी जिंदाबाद’च्या घोषणा : शिष्यांचा दावा – शंकराचार्यांच्या जीवाला धोका

प्रयागराज : प्रयागराज येथे अविमुक्तेश्वरानंद आणि मेला प्रशासन यांच्यात गेल्या सहा दिवसांपासून वाद सुरू आहे. शनिवारी रात्री काही युवकांनी शंकराचार्यांच्या शिबिरात घुसण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांनी ‘सीएम योगी जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या. यावरून अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्यांशी त्या युवकांची धक्का-मुक्की झाली.

यापूर्वीच अविमुक्तेश्वरानंद यांच्या शिष्यांनी शंकराचार्यांच्या जीवाला धोका असल्याचा आरोप केला होता. शिबिराच्या सुरक्षेसाठी आत आणि बाहेर एकूण १२ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. शुक्रवारी अचानक अविमुक्तेश्वरानंद यांची प्रकृतीही खालावली होती.

शंकराचार्यांचे विशेष प्रतिनिधी देवेंद्र पांडे यांनी सांगितले की,
“ही आमची मजबुरी आहे, कारण शंकराचार्य रस्त्यावर बसले आहेत. येथे प्रशासन आणि त्यांचे गुंड आहेत. संतांच्या वेशात शैतान फिरत आहेत. त्यांच्यामुळे शंकराचार्यांच्या जीवाला धोका आहे. रात्री येऊन व्हिडिओ बनवतात. पकडले गेल्यावर म्हणतात की नोटीस देण्यासाठी आलो होतो.”

अखिलेश यादव म्हणाले – शंकराचार्यांनी नकली सनातन्यांची पोलखोल केली

शंकराचार्य वादावर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव म्हणाले, “अविमुक्तेश्वरानंद ठामपणे उभे आहेत, याचा आम्हाला आनंद आहे. प्रत्येक खरा सनातनी त्यांच्या सोबत आहे. त्यांनी किमान नकली सनातन्यांची पोलखोल तरी केली आहे. आमचा त्यांच्याशी थेट संपर्क आहे.”

यापूर्वी शुक्रवारी अविमुक्तेश्वरानंद यांनी उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांना समजूतदार नेता म्हटले होते. ते म्हणाले होते की, “ज्यांना हे समजते की अधिकाऱ्यांकडून चूक झाली आहे, असा व्यक्ती मुख्यमंत्री असायला हवा. जो अहंकारात बसलेला आहे, तो मुख्यमंत्री होऊ नये.”

प्रत्यक्षात गुरुवारी उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनी म्हटले होते, “मी शंकराचार्यांच्या चरणी प्रणाम करतो आणि त्यांना स्नान करण्याची विनंती करतो.”

मौनी अमावस्येला नेमके काय घडले?

१८ जानेवारी रोजी माघ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी अविमुक्तेश्वरानंद पालखीतून स्नानासाठी जात होते. मात्र पोलिसांनी त्यांना रोखून पायी जाण्यास सांगितले. यावर आक्षेप घेतल्यावर शिष्यांशी धक्का-मुक्की झाली. यामुळे नाराज होऊन अविमुक्तेश्वरानंद शिबिराबाहेरच धरन्यावर बसले.

प्रशासनाने ४८ तासांत अविमुक्तेश्वरानंद यांना दोन नोटिसा बजावल्या. पहिल्या नोटिशीत त्यांच्या नावासोबत ‘शंकराचार्य’ ही पदवी वापरण्यावर, तर दुसऱ्या नोटिशीत मौनी अमावस्येच्या गोंधळावर प्रश्न उपस्थित करण्यात आले. प्रशासनाने इशाराही दिला होता की, “तुम्हाला कायमस्वरूपी माघ मेळ्यातून बंदी का घालू नये?”
अविमुक्तेश्वरानंद यांनी दोन्ही नोटिसांना उत्तर पाठवले असल्याचे सांगण्यात आले आहे.

0
0

Leave a Reply

Realted News