अहमदाबाद विमान दुर्घटना

ब्लॅक बॉक्सचा सीव्हीआर आणि एफडीआरचा बारकाईने तपास

सायबर हल्ल्यासह 2000 पैलूंवर तपास, तपास अहवाल येण्यास लागणार 3 महिने

अहमदाबाद : १२ जून रोजी अहमदाबादमध्ये कोसळलेल्या एअर इंडियाच्या विमानाचा ब्लॅक बॉक्स तपासासाठी अमेरिकेला पाठवला जाऊ शकतो. अपघातग्रस्त बोईंग ७८७-८ ड्रीमलायनर विमानाचा ब्लॅक बॉक्स अपघाताच्या दिवशी सापडला. विमानात आग लागल्यानंतर ब्लॅक बॉक्स इतका खराब झाला आहे की त्यातून डेटा मिळवणे कठीण झाले आहे. त्यामुळे तो तपासासाठी अमेरिकेला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा आहे.
                         १२ जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान एआय-१७१ अहमदाबाद येथे उड्डाणानंतर लगेचच कोसळले. या घटनेत विमानातील २४१ जणांचा मृत्यू झाला, तर एक प्रवासी बचावला. या घटनेत एकूण २७० जणांचा मृत्यू झाला.

                        अहमदाबादेत झालेल्या विमान दुर्घटनेचा सायबर हल्ल्यासह २००० पैलू समोर ठेवून तपास केला जात आहे. खरे तर दुर्घटनेची अनेक कारणे वर्तवली जात आहेत. जसे की – दोन्ही इंजिन फेल होणे, फ्लॅपची चुकीची स्थिती, पायलटची चूक, सायबर हल्ला आदी. भारत, अमेरिका, ब्रिटनच्या ८ संस्था तपास करत आहेत. ते ब्लॅक बॉक्सचा सीव्हीआर आणि एफडीआरचा बारकाईने तपास करत आहेत. मात्र निष्कर्ष येण्यासाठी तीन महिने लागू शकतात.

                         डीजीसीए दिल्लीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ब्लॅक बॉक्समधून डाटा मिळवण्यासाठी केवळ ५ मिनिटे लागतात. मात्र अहमदाबादेतील विमान दुर्घटना दुर्मिळ श्रेणीतील आहे. भारतासह सर्व जगाची त्याकडे नजर आहे. त्यामुळे सर्व पैलू समोर ठेवून तपास केला जात आहे.
परदेशात जाणार नाही ब्लॅक बॉक्स ?
                           नागरी उड्डाण मंत्रालयाने गुरुवारी म्हटले की, दुर्घटनाग्रस्त विमान एआय १७१ चा ब्लॅक बॉक्स परदेशात पाठवला जाणार नाही. हा निर्णय विमान दुर्घटना तपास संस्था योग्य मूल्यांकनानंतरच घेईल. आधी सांगण्यात आले होते की, ब्लॅकबॉक्सचे नुकसान झाले आहे. त्यामुळे डाटा रिकव्हरी देशात शक्य नाही. त्याला अमेरिकेला पाठवले जाईल.?

अहमदाबाद विमान अपघात – २११ डीएनए जुळले, १८९ मृतदेह सुपूर्द

                        आतापर्यंत अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या २११ जणांची डीएनए चाचणीद्वारे ओळख पटवण्यात आली आहे आणि १८९ मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. ही माहिती गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी काल (गुरुवारी) दिली.
                         सिव्हिल हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राकेश जोशी म्हणाले की, आतापर्यंत सुपूर्द करण्यात आलेल्या मृतदेहांमध्ये १३१ भारतीय नागरिक, ४ पोर्तुगीज, ३० ब्रिटिश नागरिक, १ कॅनेडियन आणि ६ अन्य लोक आहेत. अपघातानंतर ७१ जखमींना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यापैकी फक्त ७ रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत. उर्वरित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

   

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Realted News