आझाद मैदानावर आंदोलनासाठी पोलिसांची परवानगी; जरांगेंचेही स्वत:च्या सहीने पोलिसांना हमीपत्र
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे भव्य मोर्चाची सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा पुढे ढकलावा म्हणून मंगळवारी आपले OSD (विशेष कार्यकारी अधिकारी) मनोज जरांगे यांच्याकडे पाठवले होते.

या माध्यमातून मुंबईत सण काळात आंदोलन होऊ नये, यासाठी समजूत घालण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मनोज जरांगे यांनी मोर्चा 27 ऑगस्ट रोजीच निघणार असल्याचा ठाम निर्धार व्यक्त केला होता. दरम्यान, मुंबई पोलिसांनी जरांगे यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. तत्पूर्वी हायकोर्टाने ही परवानगी नाकारल्याने मोठा वाद झाला होता.
मनोज जरांगे यांचा मोर्चा रात्री आठ वाजता शेवगाव शहरात दाखल झाला. यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मराठी समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती. या ठिकाणी मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना संबोधित केल्यानंरत मोर्चा शिवनेरीकडे मार्गस्थ झाला.
जरांगेंनी आंदोलनापेक्षा चर्चेतून तोडगा काढूया- मंत्री दादा भुसे
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची घोषणा केली असतानाच, राज्याचे मंत्री दादा भुसे यांनी त्यांना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त असल्याचे मान्य करत, भुसे यांनी सणासुदीच्या काळात आंदोलनाऐवजी चर्चेला प्राधान्य देण्याची विनंती केली आहे.
मंत्री भुसे म्हणाले की, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या रास्त आहेत, याबाबत कोणतीही शंका नाही. परंतु, सध्या मुंबई, कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशात गणपती बाप्पांचा उत्सव सुरू आहे. अशा उत्सवाच्या काळात आंदोलनापेक्षा चर्चेतून जर काही समाधानकारक तोडगा काढता आला, तर ते सर्वांसाठी चांगले होईल.
मराठा नेत्यांनी साथ द्यावी : जरांगे
मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाच्या लोकप्रतिनिधींनी किती दिवस सगळं सहन करतील, सत्ताधारी आणि विरोधातील मराठा आमदारांना आवाहन केले आहे, तुम्ही आम्हाला साथ द्या, आज समाजाला तुमची गरज आहे, समाज तुमच्या सोबत आहे, तुम्ही समाजासोबत राहा, कशालाही घाबरू नका सोबत या साथ द्या
आमदार चित्रा वाघ यांचा मनोज जरांगेंवर पलटवार












Users Today : 1
Users Yesterday : 11