♦ ‘रोजगारा’ला १५ रुपये अत्यल्प वाढीची ‘हमी’
♦ १ एप्रिलपासून दरपत्रक लागू
भंडारा : महागाईच्या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांचे भत्ते मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दुसरीकडे रोजगार हमीवर काम करणाऱ्यांच्या मजुरीत मात्र तुलनेने अत्यल्प वाढ करण्यात आली आहे. यावरून ग्रामीण भागात घाम गाळणाऱ्या मजुरांप्रती आपल्याला फारशी आत्मीयता नसल्याचेच शासनाने दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांच्या मजुरीत महाराष्ट्रात अवधी १५ रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यानुसार आता मजुरांना दर दिवसाला ३१२ रुपये मिळणार असून १ एप्रिल २०२५ पासून हे दरपत्रक लागू करण्यात आले.
मजुरांना रोजगार मिळावा आणि शेती विकासासाठी विविध योजनाही राबवता याव्यात यासाठी रोजगार हमी योजनेतून विविध कामे केली जात आहेत. यात प्रामुख्याने सिंचन विहिरी, फळबाग लागवड, शेततलाव, घरकुले, गायगोठा, शेळीपालन गोठा आदी कामे केली जात आहेत.










Users Today : 27
Users Yesterday : 44
Views Today : 31
Who's Online : 0